- Marathi News
- सिटी क्राईम
- Update : आधी बालगृहातील लाइट फोडून जखमा करून घेतल्या, नंतर दगड, चाकू, लोखंडी रॉड घेऊन रक्तबंबाळ अवस...
Update : आधी बालगृहातील लाइट फोडून जखमा करून घेतल्या, नंतर दगड, चाकू, लोखंडी रॉड घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याने धावत होत्या ९ मुली!; छावणी ते जिल्हाकोर्ट-रेल्वेस्थानकादरम्यानचा थरारपट

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी येथील शासकीय बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी सोमवारी (३० जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास पलायन केले. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बालसुधारगृहाच्या निरीक्षकांना ही बाब लक्षात येईपर्यंत त्या बऱ्याच दूरपर्यंत गेल्या. छावणी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी येथील शासकीय बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी सोमवारी (३० जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास पलायन केले. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बालसुधारगृहाच्या निरीक्षकांना ही बाब लक्षात येईपर्यंत त्या बऱ्याच दूरपर्यंत गेल्या. छावणी पोलिसांसह दामिनी पथकाने तातडीने धाव घेऊन मुलींची धरपकड सुरू केली. त्यातील ७ जणींना पकडण्यात यश आले, २ मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत. नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप चौक- जिल्हा कोर्ट-रेल्वेस्थानकादरम्यान हा थरार घडला.
बालसुधारगृहात केले जात होते टॉर्चर
पळून जाणाऱ्या मुलींनी केलेल्या तक्रारींमुळे बालसुधारगृहातील टॉर्चरवर प्रकाश पडला आहे. बाल कल्याण समितीच्या कार्यपद्धतीवरही मुलींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. बालसुधारगृहात आक्रमक झाल्या तेव्हा त्यांनी म्हटले आहे, की बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना आमच्यासमोर आणू नका. अन्यथा आम्ही त्यांनाही बदडून काढू. शिक्षा म्हणून मारहाण केली जाते. आठवडाभर पुरेल इतकाच लहान साबण दिला जातो. टूथपेस्ट अपुरी, विशिष्ट धर्म मानणाऱ्या मुलींवर मानसिक दबाव, कर्मचाऱ्यांचे वागणे त्रासदायक असते. याप्रकाराबद्दल बालकल्याण समिती अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसादच दिला नाही.
सुधारगृहात पोलिसांकडून चौकशी
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, गीता बागवडे, प्रवीणा यादव यांनी रात्री उशिरा बालसुधारगृहात जाऊन ८० मुलींची चौकशी करत समस्या समजून घेतल्याचे छावणीचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी सांगितले, की १७ वर्षांच्या ५ मुली प्रियकरासोबत पळून गेल्या होत्या. त्यांच्या पालकांनी अपहरणाची तक्रार दिल्यानंतर शोध घेऊन पोलिसांनी परत आणले होते. त्यांनी घरी राहण्यास नकार दिल्याने बालसुधारगृहात ठेवले होते. दोन मुलींनी वाद झाल्याने घर सोडले होते, तर एका मुलीवर मानसिक उपचार सुरू आहेत. हेही वाचा : Exclusive : छावणीचे विद्यादीप बालसुधारगृह जेलमध्ये रुपांतरीत कसे झाले? – chhatrapatisambhajinagarcitynews