प्रेमविवाह केलेल्या मुलीचे कुंकू पुसणाऱ्या नराधमाला जालन्यातून अटक, छ. संभाजीनगरच्या इंदिरानगरात घडले होते ‘सैराट’स्टाइल कांड, अटकेतील आरोपींची संख्या ३ वर

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंदिरानगरात घडलेल्या सैराट स्‍टाइल कांडाचा प्रमुख आरोपी गीताराम भास्कर किर्तीशाही याला जवाहरनगर पोलिसांनी जालन्यातून अटक करून आणले. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्‍याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्‍हणून या नराधमाने पुतण्यासह मिळून तिचा पती अमित मुरलीधर साळुंके (२५) याची चाकूने भोसकून हत्‍या केली होती. शनिवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंदिरानगरात घडलेल्या सैराट स्‍टाइल कांडाचा प्रमुख आरोपी गीताराम भास्कर किर्तीशाही याला जवाहरनगर पोलिसांनी जालन्यातून अटक करून आणले. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्‍याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्‍हणून या नराधमाने पुतण्यासह मिळून तिचा पती अमित मुरलीधर साळुंके (२५) याची चाकूने भोसकून हत्‍या केली होती.

शनिवारी या प्रकरणात मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाहीच्या मुसक्या पोलीस उपायुक्‍त नितीन बगाटे यांच्या पथकाने आवळल्या होत्‍या. जवाहरनगर पोलिसांकडून मुख्य आरोपी गीतारामचाही युद्धपातळीवर शोध सुरू होता. तो जालन्यातील जावई स्वप्नील पटेकर (वय २८) याच्याकडे लपून बसल्याचे कळताच पोलिसांनी जालन्यातून त्‍याला अटक केली. त्‍याच्या जावयालाही अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ३ झाली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनेची पार्श्वभूमी…
इंदिरानगरमध्ये ही घटना घडली होती. खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. ही दोन्ही कुटुंब इंदिरानगरमध्ये राहतात. हा विरोध मोडीत काढून दोघांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले होते. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारले. त्‍यामुळे ते २ मे रोजी घरी परतले. त्यांचा संसार सुरू झाला.मात्र, खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी गेलेल्या विद्याच्या पित्‍याचा राग राग कायम होता. तिचा पिता गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलैला रात्री अमित शतपावलीसाठी बाहेर पडला असता गीताराम व आप्पासाहेबने त्याला एकटे गाठून जीवघेणा हल्ला चढवला. चाकूने त्याच्यावर गंभीर वार केले. यात अमित गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. २५ जुलैला त्याची प्राणज्योत मालवली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना

Latest News

रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (३०...
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software