२ मोठ्या कारवाया : आदर्श पतसंस्था घोटाळा : आजपासून २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; अजिंठा बँक घोटाळा : आणखी ८ जणांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७५ टक्‍के ठेवीदारांना दिलासा मिळणार असून, २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आज, २२ ऑगस्टपासून परत करण्यात येत आहेत. पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७५ टक्‍के ठेवीदारांना दिलासा मिळणार असून, २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आज, २२ ऑगस्टपासून परत करण्यात येत आहेत. पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार असून, अशा ठेवीदारांनी दोन छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची कागदपत्रे पतसंस्थेच्या एन-६ येथील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे.

यापूर्वी ५२३ खातेधारकांना २० ऑगस्टपर्यंत २६ लाख ४ हजार ३४३ रुपये परत करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, की पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू असून, ठेवीदारांनी कागदपत्रे सादर करावीत. उर्वरित लिलाव प्रक्रियाही केली जाईल. आम्ही सर्व ठेवीदारांना पैसे परत देण्यास प्रयत्नशील आहोत. जुलैमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या होत्या. संस्थाध्यक्ष, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार, सदस्य व अन्य व्यक्तींच्या नावे असलेली रक्कम, अन्य मालमत्तांची शासनाकडून जप्ती सुरू आहे. साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होण्याची शक्यता अधिकारीक सूत्रांनी व्यक्‍त केली.

अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी आणखी ८ अटकेत
अजिंठा अर्बन बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बुधवारी (२१ ऑगस्ट) दोन व्यवस्थापकांसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी याबाबतची माहिती दिली. सोपान गोविंदराव डमाळे (वय ६२, रा.जवाहर कॉलनी), मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ (वय ५०, रा. बेगमपुरा), तत्कालीन शाखा व्यवस्थापक कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे (वय ५०, शहानूरवाडी), प्रशांत भास्कर फळेगावकर (वय ५६, रा. देवानगरी), राजू सावळाराम बाचकर (वय ४६, रा. सदानंदनगर), पोपट बाजीराव साखरे (वय ५३, रा. एन-२ सिडको), ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार (वय ३५, रा. शिवशंकर कॉलनी), गणेश आसाराम दांगोडे (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी) यांचा बुधवारी अटक केलेल्यांत समावेश आहे. सीईओ प्रदीप कुलकर्णीला २ ऑगस्टला अटक झाली होती. या बँकेतून ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप, ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद व रिझर्व्ह बँकेला खोटा लेखापरीक्षण अहवाल पाठविण्यात आल्याचे समोर आले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे?

Latest News

लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे? लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे?
केवळ महागड्या कार आणि कपडेच नाही तर लक्झरी घरे देखील खरेदीदारांना आकर्षित करत आहेत. आता, बरेच लोक लाखो नव्हे तर...
इन्व्हर्टरवर चुकूनही चालवू नका या गोष्टी, लगेचच सर्व वीज संपवून टाकतील, नवीन बॅटरी घ्यावी लागेल विकत!
अभिनेता सिद्धार्थ निगम विशेष मुलाखत : दुपारी जेवलो तर रात्रीच्या जेवणाबद्दल माहीत नसायचं; वाईट परिस्थिती तुम्हाला मजबूत बनवते!
Analysis : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ‘बिग फाईट, वातावरण टाईट!’; शिरसाट, सावे, दानवेंमध्ये वर्चस्वाची लढाई
महिलेला मैत्रीण भेटायला आली, गप्पा मारल्या, जेवण केले, नंतर मैत्रिणीने असे काही केले की हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software