बॉलीवूड सोडल्यानंतर चित्रांगदाला कळलं, मी फक्त चित्रपटांसाठीच बनले!; विशेष मुलाखतीत हाऊसफुल्ल ५ च्या मायाने सांगितली अक्षयसोबतची मैत्री

On

हजारों ख्वाईशें ऐसी… या चित्रपटात गीता रावची दमदार भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंह सध्या मल्टीस्टारर मसाला एंटरटेनर हाऊसफुल ५ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत, आम्ही चित्रांगदासोबत तिच्या कारकिर्दीबद्दल आणि चित्रपटांच्या निवडीबद्दल खास बातचीत केली… प्रश्न : तुझे वडील सैन्यात होते, तुझा भाऊ खेळात होता, […]

हजारों ख्वाईशें ऐसी… या चित्रपटात गीता रावची दमदार भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंह सध्या मल्टीस्टारर मसाला एंटरटेनर हाऊसफुल ५ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत, आम्ही चित्रांगदासोबत तिच्या कारकिर्दीबद्दल आणि चित्रपटांच्या निवडीबद्दल खास बातचीत केली…

प्रश्न : तुझे वडील सैन्यात होते, तुझा भाऊ खेळात होता, तुला सिनेमाच्या प्रेमात कसे पडले?
चित्रांगदा
: मी हजारों ख्वाईशें आणि कल : यस्टर्डे ॲन्ड टुमारो हे दोन चित्रपट केल्यानंतर मी ३ वर्षे बॉलीवूड सोडले. पण जेव्हा मी सिनेमापासून दूर राहिले, तेव्हा जाणवले की मला सिनेमाची किती आठवण येते. त्यातून किती समाधान, किती आनंद मिळत असे. अभिनयामुळे मला जिवंत वाटायचे, तेव्हा मला वाटायचे की मी यासाठीच बनले आहे. त्याआधी मला असं वाटायचं की, काम आहे तर करूया. सुधीर मिश्रा ऑफर देत असतील तर करते… पण जेव्हा मी चित्रपटांपासून दूर गेले, तेव्हा मला चित्रपटांवरील माझ्या प्रेमाची तीव्रता जाणवली.

प्रश्न : इंडस्ट्रीमधील दोन दशकांच्या प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता? जर तुला २० वर्षांपूर्वीच्या चित्रांगदाला काही सल्ला द्यायचा असेल तर काय देशील?
चित्रांगदा :
माझा प्रवास खूप सुंदर राहिला आहे. कारण अभिनयाने मला स्वतःची ओळख करून दिली. माझ्या पहिल्या चित्रपटादरम्यान मी सुधीर (दिग्दर्शक सुधीर मिश्रा) यांना सांगितले होते की तुम्ही मला स्वतःची ओळख करून दिली आहे. मला एक नवीन ओळख दिली आहे. कारण मला माहीत नव्हते की माझ्यात अशी प्रतिभा आहे किंवा मी माझ्या आयुष्यात असे काही करू शकते. ज्यासाठी मला लक्षात ठेवले जाईल किंवा कौतुक केले जाईल. म्हणून, मला जे काही मिळाले आहे तो एक मोठा बोनस आहे. मला मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल चाहत्यांची, सहकाऱ्यांची मी खूप आभारी आहे. पण जर मला २० वर्षांपूर्वीच्या चित्रांगदाला सल्ला द्यायचा असेल तर मी म्हणेन की खूप मेहनत कर. फक्त सेटवरच नाही तर सेटच्या बाहेरही अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. लोकांना भेटणे असो किंवा तुमचा जनसंपर्क वाढवणे असो… हा आमच्या कामाचा एक मोठा भाग आहे, जो मला आधी माहित नव्हता. मला वाटलं होतं की काम माझ्या वाट्याला येईल. पण जेव्हा जेव्हा काम माझ्या वाट्याला आलं तेव्हा मी ते मनापासून केलं आहे. पण सेटच्या बाहेरही खूप काम करायचं आहे आणि ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

प्रश्न : हजारों ख्वाइशें ऐसी आणि इंकार सारख्या उच्च आशयाच्या चित्रपटांपासून सुरुवात केल्यानंतर, तू देसी बॉईज आणि आता हाऊसफुल ५ सारख्या मसाला चित्रपटांमध्येही दिसलीस. या दोन्ही स्वरूपाच्या चित्रपटांपैकी तुला काय आवडते?
चित्रांगदा :
माझा असा विश्वास आहे की कोणताही माणूस साधू किंवा संतांसारखा पूर्णपणे सरळ नसतो. त्याचप्रमाणे, कोणीही पूर्णपणे वाईट नसतो. प्रत्येकाची एक राखाडी बाजू असते, म्हणून उच्च आशय असलेल्या खऱ्या पात्रांमध्ये अभिनयासाठी भरपूर वाव असतो. त्यात भावनांच्या अनेक छटा दाखवता येतात. दुसरीकडे, देसी बॉईज सारख्या चित्रपटांमध्ये, फक्त अभिनय चालणार नाही. तिथे, तुम्हाला ग्लॅमरसही दिसावे लागेल, तुम्हाला मनोरंजनही द्यावे लागेल. एक ऊर्जा, एक उत्साह दिसला पाहिजे, म्हणजे ते पूर्णपणे वेगळे व्यक्तिमत्व आहे. हे दोन पूर्णपणे वेगळे पैलू आहेत आणि दोन्हीची मजा वेगळी आहे. उदाहरणार्थ, हाऊसफुल ५ मध्ये मी पहिल्यांदाच स्लॅपस्टिक कॉमेडी केली, जी खूप कठीण आहे. मी खूप घाबरलो होते. शॉट दिल्यानंतर, मी रितेश किंवा श्रेयसला विचारायचे की ते ठीक आहे का? त्यामुळे तो खूप मजेदार अनुभव होता. मला खूप काही शिकायला मिळाले.

प्रश्न : एक अभिनेता असण्यासोबतच तू एक निर्मातादेखील आहेस. प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे यावर तुला काय वाटतं? त्यासाठी आपल्याला मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे का?
चित्रांगदा :
खरे सांगायचे तर, हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि मी निर्मात्यापेक्षा अभिनेत्री जास्त आहे. मी स्वतःला एक पॅशन प्रोड्यूसर मानते. मी सूरमा चित्रपट बनवला. कारण ती एका खऱ्या हिरोची कथा होती आणि मला वाटले की ती बनवली पाहिजे. मी पूर्णवेळ निर्माता नाही. मी पुढचा चित्रपट बनवत आहे तो देखील यामुळेच आहे. पण हो, आज प्रेक्षकांकडे खूप पर्याय झाले आहेत. लोकांना थिएटरमध्ये कसे आणायचे आव्हान आहे. हे फक्त आपल्या इंडस्ट्रीतच नाही, तर ते सर्वत्र दिसून येत आहे. हॉलिवूडदेखील या आव्हानांमधून जात आहे. मला सुधारणांबद्दल माहिती नाही, परंतु जितक्या चांगल्या, खऱ्या आणि अधिक खऱ्या कथा सांगितल्या जातील तितके लोक जोडले जातील असे मला वाटते.

प्रश्न : तुम्ही १५ वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत देसी बॉईज चित्रपट केला होता. त्यानंतर जोकर, गब्बर इज बॅक, खेल खेल में आणि हाऊसफुल ५ मध्ये एकत्र काम केले. त्याची आणि तुझी मैत्री किती घट्ट आहे? चित्रपटादरम्यान त्याच्याकडून काही मार्गदर्शन मिळाले का?
चित्रांगदा
: खूप मार्गदर्शन मिळाले. मी हाऊसफुल ५ करत आहे याबद्दल तो खूप आनंदी होता. तो मला सांगत राहिला की हे जास्त करू नको. मायाचे पात्र थोडे गंभीर असल्याने, ती इतर पात्रांसारखी मजेदार असू शकत नाही. मी त्याला इतक्या वर्षांपासून ओळखते. आम्ही मित्रांसारखे आहोत, मी त्याला कधीही फोन करू शकते. जर मला काही विचारायचे असेल, सल्ला घ्यायचा असेल तर अक्षय मला सत्य सांगेल की हे चांगले दिसत नाही, असे करू नको.

प्रश्न : हाऊसफुल ५ मध्ये ज्या प्रकारे महिला पात्रांना ग्लॅमर किंवा डोळ्यांना आनंद देणारे म्हणून दाखवण्यात आले आहे त्यावरही टीका होत आहे. तुला वाटत नाही का की महिलांना पडद्यावर चांगले प्रतिनिधित्व मिळायला हवे?
चित्रांगदा :
मी तुमच्याशी सहमत आहे, पण जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर त्यात पुरुषांबद्दल बरेच विनोद आहेत. पुरुषांवरही खूप विनोद आहे. मला समजते की महिलांच्या बाबतीत हे जास्त जाणवते, पण प्रत्येक चित्रपटाचा सूर वेगळा असतो. याचा अर्थ असा नाही की आपण फक्त असे चित्रपट बनवत आहोत. जसे अक्षय कुमारने स्वतः पॅडमॅन, केसरी, टॉयलेट एक प्रेमकथा असे अनेक चित्रपट बनवले आहेत. मी हजारों ख्वाइशें ऐसी आणि इंकार सारखे सशक्त महिला पात्र असलेले चित्रपट देखील केले आहेत. पण त्यात देसी बॉईज वेगळे होते, कुंडी मत खटकाओ वेगळे असते, म्हणून एक अभिनेता त्याच्या कारकिर्दीत सर्व प्रकारची कामे करतो. मला वाटत नाही की आपण चित्रपटाच्या विनोदाचा झेंडा हाती घ्यावा. अर्थात, ज्यांना असा विनोद आवडत नाही त्यांचा मी आदर करतो, परंतु माझ्या मते निर्मात्यांचा तो हेतू नव्हता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software